गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

खेळ मांडला

 धरतीचा कोप होऊनी हादरली ती माता

पाप केले का कोणते त्या जीवांनी

कंप तुझा हा वेगळाच प्रवास जीवांचा

थरकाप उडतो केला विचार जरी कोणी,


घरदार उध्वस्त झाले

कित्येक प्राणही गेले,

भांडी कुंडी संपूर्ण संसारच मोडून पडला

गुरं बांधलेली गोठ्यात तो गोठाच कुठे दडला,

किंकाळ्या आक्रोश गती ती मंद झाली

मरणास समोर बघून काय अवस्था असेल झाली,


उंच उंच इमारती जमीनदोस्त झाल्या

रक्तांच्या नद्या उगम पावल्या,

कोणी जिवांशी कोणी हाताशी पायाशी गेले

जीवन झाले ते लुळे पांगळे,


समुद्राला हि उधान आले

आले ते आले होते नव्हते सारे नेले,

भयंकर तो लाटांचा मारा

सागरही हद्द सोडून 

लढवयास बाहेर आला,

बलाढ्य तो सागर, बलाढ्य ती त्याची सेना

कोण लढेल त्याच्याशी 

एकही जीव आपले प्राण वाचवेना,


पावसानं न जाणो कोणता राग काढला

पाण्याचा जणू धबधबाच सोडला,

रस्त्यांच्या नद्या झाल्या

घराच्या चार भिंतीत नाचू लागल्या,


घरचे कर्ता करविता तर गेलेच

पण कुटुंबच्या कुटुंब गुदमरून मेले,

महापुराने गाव उध्वस्त झाले

शेती,गुरे वासरे काही माणसांनाही वाहून नेले,


अश्रू उभे राहतात डोळ्यात,

आठवल्यावर तो कहर

देवा,जीवांशी खेळण्याची 

ही कसली तुझी लहर,


कर जे तुला जे करायचंय ते

जो खेळ मांडायचा आहे तो मांड

सवय झाली आता या सगळ्याची

डोळ्यातलंही पाणी आटलंय आता

चिंताच नाही वाटत कशाची आता


फक्त बळ दे हे सारं सोसण्याच

मोडलेला संसार परत उभं करण्याचं

जीवांना घडवलं तूच

तूच ठेव सुखी

नको करुस दुःखी नको 

हवंय आम्हाला काही अवांतर.



**सचिन विश्राम कांबळे**



ती कळी

 


एक सकाळी कळीकडे पाहून
विचार करत होते बसले
फुलणाऱ्या त्या कळीस पाहून
मनी चिंतेचे वादळ उठले

उद्या ती कळी फुलणार आहे
फुलून सुंदर फुल बनेल
वाईट दृष्टी ना पडो कोणाची
फुलण्या आधीच ते गळेल

सताविते मना हीच चिंता
कोणा हाती ते फुल पडेल
देवा चरणी वाहिले जाईल
की कोण डोईवर सजेल

कोणी मध्येच येऊन
बिनकामी तर नाही ना तोडेल
पाकळी पाकळी तोडून अशी
नाही ना कोणी विखरेल

इच्छा मनी सजावे डोईवर
चरणी देवाच्या पडावे
या नको ते कोमेजून जावे
हीच चिंता मनी खूप सतावे

**सचिन विश्राम कांबळे**


बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१

दाखवून द्या चुका

 बरं झालं तो गेला

का बरं तो असं म्हणाला

बोचले ते शब्द

हादरवले सरणाला


कोणा बद्दल वाईट बोललो

असं तर आठवत नाही

कोणाचं वाईट चिंतलं

हे ही लक्षात येत नाही

मग का असं तो म्हणाला

बरं झालं तो गेला


आज कळलं या सरणावर

नकळत घडतात हातून चुका

कळत नसतं त्या वेळेला

मग मेल्यानंतर शोधायचा का मोका

म्हणून तो असेल म्हणाला

बरं झालं तो गेला


मनात तुझ्या सलत होतं

आधीच ते बोलायचं होतं

चूक बरोबर केली असती

जर त्यावर पांघरून घातलं नसतं

त्या वेळेलाच असता अडवला

तर आज म्हणाला नसता

बरं झालं तो एकदाचा गेला


दाखवून द्या चुका 

चुका माणूसच करतो

प्रायश्चित्त आहेना पर्याय

चुकातूनच माणूस शिकत असतो


मेल्यावर त्याचे गुण गाणार

या त्याच्या चुका काढणार

तेव्हा चुका दाखवून काय फायदा

फक्त हा डाग मरणानंतरही त्याच्यावर राहणार


***सचिन विश्राम कांबळे***



मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

नाती गोती

 

कोणा सांगावे दुःख
कोणा पुढे हात पसरू
धाव घेई उराशी लावून
कसं तरी बरं व्हावं लेकरू

न असता गाठी तो पैका
कोणी म्हणलं का करीन मदत
दीन दीन अशी भटकले
कोणता हात नाही पुढे सरत

दुःख हेच कडवे या जगात
ना जाणे कोणी कोणाचे दुःख
सुखाचे असती सारे सोबती
पुढे पुढे नाचती असता सुख

राहील उभा तोच पाठीशी
दिला जन्म तो विठू पांडुरंग
नाती गोती इथे नसे कामाची
वेळी दाखविते आपले रंग

**सचिन विश्राम कांबळे**


सुटला हात

 

कोण ऐकून घेईल ही व्यथा
थाटला संसार क्षणात तुटला
काय होती चूक अशी झाली
जन्मभरासाठी धरला हात सुटला

अपराध हाच होता का माझा
घेतला जन्म तो गरिबा घरा
पगडी ठेऊनी लाचार बाप माझा
वेदनेने वाही डोळ्या अश्रू धारा

हाव इतकी असे का कुठे कुणा
लाचार ती माणुसकी त्या पुढे झाली
स्वार्था लोभा पायी नातीही हरली
माया शब्दाची नुसती,तीही पैशात तोलली

***सचिन विश्राम कांबळे***


सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१

त्याला मनात जपलं

 

तो मला रोजच पाहत होता
प्रेम दीवाना असावा असं वाटलं
जास्त लक्ष नव्हतंच त्याच्याकडे
सोडून द्यावं दुर्लक्ष करावं म्हटलं

पण रोज मागे मागे यायला लागला
माझा पाठलाग करायला लागला
मी जिथे जिथे जायची
तिथे तिथे माझ्या आधी तोच पोहचायला लागला

हळु हळु तो रोज
माझ्या जवळ यायला लागला
माझ्या क्लासच्या कॉलेज वेळा
सर्व कळायला लागल्या त्याला

मला ही त्याची सवय झाली
त्याची आणि माझी एक वेळ होत गेली
त्याच अस बघणं आवडायला लागलं
आणि मलाच नाही कळलं मी त्याची कधी झाली

मी त्याच्या प्रेमात बावरी झाली
दिवस रात्र त्याच्या विचारात गुंग झाली
त्याला हे माहीतच नसेल
की नकळत मी त्याच्या प्रेमात कशी पडली

अचानक तो कुठे गायब झाला
बहुतेक माझ्याकडून प्रतिसाद नाही म्हणून
कंटाळा आला असावा त्याला
आणि हे सगळं सोडून गेला

पण मी मात्र त्याच्या प्रेमात वेडी
डोळे माझे त्यालाच शोधत राही
खूप शोधले त्याला असे किती दिवस गेले
पण तो परत कधी आलाच नाही

वाटलं ती वेळ परत यावी
त्याची माझी भेट परत व्हावी
त्याला मनातलं तेव्हा सांगून टाकावं
त्याला आपल्या मिठीत घ्यावं

मग कळलं तो निघून गेला
तिथेच प्रेमाचा माझ्या बळी गेला
गेलेली वेळ परत येत नाही
खंत तो मनात तसाच राहिला

आज ही त्याच्या आठवणीत जगते
त्याला माझ्या ह्रुदयात जपला
खरं प्रेम काय असतं कळलं
त्याच्या आठवणीने उर भरला

***सचिन विश्राम कांबळे***


शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१

अशी परवड ( विनोदी )

 

घेता थोडी.. थोडी
झाले खंबे दोन
चाललो रस्त्यात
मला अडवेल कोन

दिला आवाज मागून मला
थांबलो विचारलं हम आपके है कौन
खोचून साडी खेकासली मला
बायको तुमची आणि हे नमुने दोन

घरी गेलो अंथरुणात पडलो
डोळा लागताच पडला चोप
राग आला ओरोडलो त्याला
कोण रे तू मोडतोय माझी झोप

विचारताच माझा घेतला रिमांड
बाप हाय तुझा घरचा हायकमांड

बाबा जाताच अंग टाकले
चालून चालून होते पाय दुखले

बघता समोर उभी तिला
न जाणो कसे आले लाड मला

लाडात म्हणालो ये कारभारीन
डोकं फिरलं तुमचं मी तुमची मोलकरीण

डोकं अंग सारं झालं जड
अशी ही झाली माझी परवड

मोलकरणी जाताच बायको आली
वरण भात दे मला भूक लागली

वरण नाही केलंय केलाय फ्राय भात
ऐकताच बाकासुर आला अंगात

पुढ्यात येता ताट
घातला घास तोंडात
बायको ओरडली
अहो! का खाताय माझा हात

झोप उडाली जागा झालो
काय हो येतंय तुमच्या मनात
चावली जीभ भित बायकोला
होतो मी स्वप्नात... होतो मी स्वप्नात....

*सचिन विश्राम कांबळे*


असं काय कमावलं

 स्वतःच इथे अस काय असतं

रिकाम्या ओंजळ आले असतो

खाली हातच जावं लागतं

जीवनाचं हे चक्र असच असतं


काय कमावलं ते इथेच राहणार

हक्क गाजवत का मिरवायच

जीव असे तोवर तुमचंच असतं

मेल्यावर काय थोडी घेऊन जाणार


कोणती गोष्ट स्वतःची अशी कशी म्हणणार

धन, दौलत,संपत्ती,पैसा, नाती

हयात असेल जोवर तुमचे असतील

मरणा नंतर हे सारं इथेच सुटणार


चांगले कर्म,चांगले गुण,चांगली वाणी हेच तुमचं

कायम राहतील नाही कुठेच दडणार

आयुष्यभर हेच लक्षात राहतील त्यांच्या

जे तुमच्या सरणावर रडणार....


*सचिन विश्राम कांबळे*


शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१

मजेत राहायचं

 

आयुष्यभर काबाड कष्ट करून
आयुष्य हे असंच संपतं
हिशोब मांडून गणती करून
नाती जपून जपून दमतं

शेवटी बायको म्हणते
असं वेगळं काय करता
कर्तव्य तुमचं च हाय
म्हणुन तर आम्हाला पोसता

मुलं सुद्धा असच म्हणतात
काय केलंय आमच्यासाठी
रात्र दिवस देह झिजवला
कमावलं हे सर मग कोणासाठी

गणती करून करून
कोणाला काय हिशोब दाखवणार
डोळे बंद करून दूध पिनाऱ्याला
बाहेरचं जग काय दिसणार

प्रेम कमवा, माणुसकी कमवा
कोणाला न दुखावता जगा
मरणा नंतर हेच आठवणारवि

वीनत राहा नात्याचा एक एक धागा

धन संपत्ती पैसा काय आहे
आणि हे कोण बघणार
तुमचं असं इथे काहीच नाही
शेवटी सारं काही इथेच आहे सुटणार

किती काय कमावलं
आता कशाला बघायचं
आयुष्य हे एकदाच मिळतं
मस्त हसत खेळत मजेत जगायचं...

**सचिन विश्राम कांबळे**



उस्तुकता पहिल्या भेटीची

 

बाजूची सरू बोलतेय असा
आला तिचा फोन मला
कधी कुठे कसा भेटशील
भेटून काहीतरी सांगायचंय तुला

शहारले अंग मनात गुदगुल्या
असंख्य प्रश्नांचे कोडे मनाला
चलबिचल सुरू झाली मनात
पहिलीच वेळ कोणा मुलीचा फोन मला

रात्र विचारात संपतच नव्हती
दुरूनच पहायचो जिला
स्वप्नात येणारी सत्यात अवतरली
उद्या प्रतेक्षात भेटणार मी तिला

कशी तरी रात्र संपली
सकाळी लवकर उठून तयारी केली
नऊ वाजता भेटायचं ठरलं होतं
जीवाची मात्र घालमेल झाली

कोणते कपडे घालायचा प्रश्न...
जीन्स घालू की फॉर्मल घालू
मन कासावीस तिच्या भेटीस
पहिलीच भेट तिची काय गिफ्ट देऊ

बरोबर भेटीच्या वेळेत ती
अन् मी ही हजर झालो
इतक्या जवळ पाहून तिला
एक क्षण मी स्वतःलाच विसरलो

कसं बोलावं पहिलीच वेळ होती
मी काही बोलण्या आधी तिनेच सुरुवात केली
फायनान्स कंपनी कामाला हीच वेळ ऑफिसची
म्हणून तुला भेटण्यास हीच वेळ निश्चित केली

असंख्य कडकडल्या विजा मनात
बोल लवकर बोल काय सांगायचं तुला
मनाशीच बोललो आता प्रतीक्षा नको
कंठ खोलून प्रपोज करावं का तिला

इतक्यात तीच म्हणाली
लोन घेतलं का रे नोटीस देणार आहेत तुला
बोळात राहतोस माझ्या म्हणून
सांगावसे वाटले तुला
हेच काम होतं म्हणूनच
भेटायला आले तुला

वेदना झाल्या खोल मानाला
रंगवलेल्या त्या स्वप्नांची क्षणात माती झाली
पहिलीच वेळ तीही अशी निसटून गेली
अशी राव चांगलीच फजिती माझी झाली....

*सचिन विश्राम कांबळे*


गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१

प्रेम हवं

 

मीच माझा एकटाच
सोबत नसलं कोणी जरी
माझ्यात मी रमतो
कोणाचं नसतं ओ घरी

बाबू चिनू सच्चू मोनु
ऐकू यावं कधीतरी
मी एकटाच राहतो
आईबाबा कुठे असतात घरी

शब्द ते हरवले कुठे
कोण बोलणार माझ्या सवे
प्रेमानं मायेनं बोलायला
आई बाबा तर घरी हवे

माझा मी मलाच शोधतो
टिव्ही समोर एकटाच बसतो
थोडाही वेळ मला दिला नाही कोणी
आईबाबा असून ही पोरका मी

भविष्याचा विचार हवा कशाला
आजचे हाल काय माझे ते तर जाना
प्रेम हवंय हवी माया तुमची
नको एकटेपणा नको मना यातना

**सचिन विश्राम कांबळे**


बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१

प्रवास आयुष्याचा


आयुष्य हे

एक प्रवाह नदीचा
आईच्या गर्भात फुलतो
मधुर आवाजात उगम पावतो
नियतीच्या चक्रा नुसार जन्म होतो

खलखळणाऱ्या झऱ्यागत
खेळतो नाचतो बागडतो उड्या मारतो
बालपणाचा आस्वाद घेऊन
मनमौजी जगतो
छोट्या छोट्या साखळीने प्रवाह बनतो

अनेक छोटे मोठे ओढे
येऊन मिळतात
त्यांच्यात रमतो गमतो
बेधडक तरुणाईची बेधुंद मिजास जगतो
खूप मोठा प्रवाह बनतो

प्रत्येक वळणावर चढ उतार मिळतात
असंख्य बाधांचा अवरोध भेदून
एक नवीन  संथ शीतल निर्मळ
प्रवाहाच्या शोधात निघतो

काटे कुटे पोटात घेऊन
प्रत्येक मार्ग मोकळा करत
एक नवजिवनात प्रवेश करतो
डोहा स्वरूपात
कुठे तरी जाऊन थांबतो अन् शांत होतो

खूप खोल डोह
त्यात भावना प्रेम काळजी लपलेली असते
कोणी त्याची खोली सांगु शकणार नाही
त्या भावना,प्रेम काळजी ओळखू शकणार नाही
कारण तो शांत पुढच्याप्रवसाची तयारी करत असतो

पुढे संथ वाहत वाहत
हळू हळू गती ती मंद होते
अन् प्रवास इथेच संपतो
शेवट त्या सरणावर होतो
प्रवाह सागरात विलीन होतो.....

शेवटी तुम्हाला देऊन जातो
दगड,वाळू बाष्प पाऊस पाणी
उदरनिर्व्हाचा बंदोबस्त करुन ठेवतो
धन संपत्ती,पैसा
इथेच सोडतो तुमच्या भविष्यासाठी
जे त्यांनी कमवलेला असतो

प्राणहीन देह तो ही
भक्ष म्हणून छोटे जीव किडे यांच्या स्वाधीन करतो
कुटे तरी पुण्य करतो
नाहीतर राख होऊन या मातीत मिसळून जातो
घेऊन जातो तो फक्त प्राण
जो तुमच्यावर कधीतरी
ओवाळून टाकलेला असतो....

*सचिन विश्राम कांबळे*

मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१

परिस्थितीची शिकवणं

 

वाईट परिस्थिती आमची होती
काय वेळ वाईट होती ती
नशिबावर हक्क गाजवून
काय होती मिरवत ती

तुटके फुटके गाळ जीवनी
तडजोड का आमच्या नशीबी
श्रीमंती कुठे होती दडली
वाटणीस आली ती गरिबी

दप्तर होतं आशेनं भरलेलं
पण झोळी आमची रिकामी
कसं तरी पोट भरी आमचं.. आई
भाग्य आमचं मात्र निकामी

कुणा दप्तरतून असता पडले
तुकडे तुकडे गोळा करू खडू
परिस्थितीस पाठीवर मारून
कोसळत होतं रडू

एक पाटी होती फक्त
वही ती एक एक कागद बहुमोली
गरीबीच होतं डोक्यावर ओझं
हात होते खाली

मास्तर जेव्हा काढी पुस्तक
शिकवण्यास धडा
पुस्तकं नव्हती आमच्या हाती
भरून होता डोक्यात बुध्दीचाच घडा

चोर नजरेनं पाहत होतो
डोकावून बाजूच्या पुस्तकात
काय करावं कसं शिकावं
का गरीब आम्ही जन्मजात

पुढे सरलो मागे ना वळलो
गरिबीचे घोटून पाणी
चटके सोसत उन्हात चाललो
पायतान नसता बहीण भाऊ अनवाणी

हात पसरला ना कुणा पुढे
कितीही संकटं आली जरी
खूप शिकलो पुढे गेलो मोठे झालो
परस्थितीच्या शिकवणीनं अन् बुद्धीच्या बळावरी.

*सचिन विश्राम कांबळे*


सोमवार, २० सप्टेंबर, २०२१

पैसा झाला मोठा

 

नाती गोती विसरतो...लहान थोर ना ओळखतो,
गर्वाचा बाजार भरला... प्रेमाचा हा शब्दच नाही उरला,
उर्मटपणाचा जन्म झाला,
माणुसकीपणा झाला लुळा पांगळा,
का तर पैसा आहे मोठा......

बालपणीचा तो सखा सोबती,
आठवणीतल्या त्या गोड गमती-जमती,
जरा मदतीसाठी फिरला अवती-भोवती,
मदत न करता अपमान त्याचा केला,
मित्र असूनही एक मित्र हताश होऊन गेला,
का तर फक्त पैसाच आहे मोठा.....

हुशार आहे मुलगा माझा शाळेत भरती त्याची करा,
घेतो शाळेत तेवढी देणगी मात्र भरा,
हुशारीची काही किंमतच नाही राहिली,
विद्यार्थ्यांच्या पैशांनी स्वतःची इमारत मात्र उभारली,
विद्यार्थी पास होताच श्रेय मात्र घ्या,
गुरुदक्षिणा म्हणून आणखी देणगी द्या,
का तर पैसा आहे मोठा...

मतदान येताच गरिबांच्या हाता पाया पडा,
निवडूण येताच मिळतो चांगलाच धडा,
एका कामासाठी सारखे करा ये - जा,
काम न होता फक्त आश्वासन घेऊन या,
शाळा, नोकरी भरतीसाठी पदर त्यांच्याकडे पसरा,
लगेच लावतो तेवढा पैशाचा बंदोबस्त जरा करा,
का तर फक्त पैसाच आहे मोठा....

कोणालाच कोणाचीच जाण नाही.....
नात्याला नात्याच भान नाही,
हाती नसेल पैसा तर शरीरात काही प्राण नाही,
जिकडे तिकडे चालला आहे पैशाचाच खेळ,
नसेल खिशात पैसा तर येते वाईट वेळ,
बहीण-भाऊ, माय-बाप पैसा आहे झाला,
रक्तारक्तात माणसाच्या पैसाच आहे मिसळला,
का तर पैसा,पैसा,पैसा फक्त आणि फक्त पैसा झाला मोठा
                                    *****

       *सचिन विश्राम कांबळे*


नवी पहाट

  नवी पहाट सरली ती रात्र काळोखी उजाडली नवी सोनेरी पहाट चकाकणाऱ्या दवबिंदूचा तृण पातीवर निराळा थाट किलबिलाती झेप घेती अवकाशात ते खुळे पक...