प्रेम म्हणजे काय? प्रेम काय असते
जेव्हा कळते तेव्हा मात्र
हातातून वेळ निघून गेलेली असते
आयुष्याची बेरीज वजाबाकी करत
हातात शेवटी शिल्लक काहीच नसते
एकमेकांच्या चुका काढण्यात
वेळ वाया घालवलेला असतो
त्यावर एकमेकांना समजण्याचा
प्रयत्न देखील केलेला नसतो
एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात
प्रेमाचं अस्तित्व कमी झालेले असते
आयुष्याची बेरीज वजाबाकी करत
हातात शेवटी शिल्लक काहीच नसते
अजूनही वाटलं वेळ गेलेली नाही
जरूर प्रयत्न करून पहावे
झालेल्या चुका, गैरसमज
प्रेमानेच बदलून घ्यावे
कमी झालेले प्रेम हे
थोड्याशा तडजोडीने पुन्हा मनात वसते
आयुष्याची बेरीज वजाबाकी करत
हातात शेवटी शिल्लक काहीच नसते
एकच लक्षात असावे
सरलेली वेळ परत येत नाही
भूकाळात परत जाऊन
वावरता येत नाही
कोण चुकीचं,कोण बरोबर
कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ
वादात या आयुष्य आपले
गुरफडून गेलेले असते
आयुष्याची बेरीज वजाबाकी करत
हातात शेवटी शिल्लक काहीच नसते......
समंजसपणा, विचाराची कुवत
यानेच प्रेम टिकत असते
एकमेकांच्या नजरेने पाहत खोलवर
परणामी तुमचेच चित्र दिसते
प्रेमानं विश्व जिंकावं
ही भावना जेव्हा मनात रुजते
आयुष्याची बेरीज वजाबाकी करत
हातात शेवटी शिल्लक गुणाकार रुपी बरेच काही असते.
***सचिन विश्राम कांबळे***
अतिशय सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवा