आभाळ फाटलं धरतीवर आलं
काळ ओढून स्वतःवर तू असा कसा गेला
लात मारून पाठीवर लेकरांच्या
त्यांना पोरके करुन जो गेला
इतके दिवस मनातच साठवुन
जीव आपला कोंडून होता ठेवला
कुणा जवळ मोकळं न होता
असा स्वतःच कुढत का बसला
एकदा तरी सांगायचं होत मनातलं
कसला होता पेच होता कसला घोर
पाचच वर्षाचा संसार सोडून गेलास
कुणा साथ कशी जागावी ती पोर
कुणा नावाचं लावावं कुंकू
कुणासाठी माळावा गजरा
मंगळसूत्र तिचं तोडून गेलास
कोमेजून गेला तो चेहरा हसरा
स्वतःचा जीव घेण्या आधी
सांगून तरी बघावं होतं थोडं
मुळा सकट उकळून टाकलं
राहिलं ते फक्त तिचं मढ
कसं जगावं कसं काढावं आयुष्य तिनं
स्वत:चा जीव घेऊन कुशाल जो गेला
कोणा दारी वसरी भटकावं तिनं
पाठी मागे नुसता वनवासच सोडला
विचार नाही केला कसलाच
मायबाप,बायको,लेकरांचा
आयुष्य नव्हतं इथेच संपत
वेळ होता ना वाट काढायचा
पळवाट चांगली शोधलीस
असा हतबल होऊन स्वतःला संपवलं
विचार ना कशाचा ना कुणाचाच
विडा घ्यावा त्यागत घरच्यांना मरवलं
घुसमट होत असेल कुणाची
दडपण मनातलं मनात ठेऊ नका
एकच पर्याय नाही यावर पाठी हाल घराचे
मन करा मोकळे कधी कुणी असं करू नका...
*सचिन विश्राम कांबळे*
लई भारी लिहलंय!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप मस्त रचना अप्रतिम सर...🌺🌹🌿🌺🌺🌹🌹👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिलंय अप्रतिम रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप छान 👌👌👌
उत्तर द्याहटवा